Telegram Group Search
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*आयुष्यात नेहमी पडद्यामागे राहून कार्य करा कारण त्यामागे कुठल्याही प्रकारे लोभ, प्रसिद्धी नसते ना स्वार्थ असतो..!*_

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*अमर्यादित यश मिळवण्यासाठी मर्यादित बंधनाचे सकारात्मक उल्लंघन करावे लागते.*_


*#जय_शिवराय🙏🏻🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_मन शांत ठेवायला व उत्तरांची प्रतीक्षा करायला शिकलात तर बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे तुमचं मन तुम्हाला देत असतं._*

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*ध्येयापेक्षा सुंदर काय असेल तर त्या ध्येयापर्यंत प्रवास करताना जगलेले क्षण..!*_

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*संयम या सारखं या जगात शांतप्रिय शस्त्र कोणतंही नाही.*_

*हर हर महादेव 🚩*
आपल्यात संत ज्ञानेश्वर महाराज असे होते की,
ते महाराज असून सुद्धा लोक त्यांना "ज्ञानी यांचा राजा" म्हणजे च राजे असे म्हणत होते. 🙏🏻
आणि
आपल्यामध्ये "छत्रपती शिवाजी महाराज " असे होते की ते महाराज असून सुद्धा लोक त्यांना "राजे" असे म्हणत होते. 🙇🙏🏻👑

म्हणजे च महाराज असून सुद्धा ते राजे होते ,
आणि
एकीकडे एक राजा सर्व जनते साठी *महाराज* होते, अजूनही आहेत, आणि पुढेही राहणार. 🙏🏻🙇💯

छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩👑
ऊर्जामंत्र
शिवराय_एक_शक्तीदाते
प्रेरणास्थान
_दैवत शिवशंभू_
"सार्वभौम सत्तेचे छत्र धारूनी, स्थापिली हिंदूपत पातशाही,
म्लेंच्छ निर्दाळूनी कातळी तख्तावर बैसले, श्री राजा शिवछत्रपती"🙏🏻🚩♥️
.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा,६ जून( तारखेनुसार)💐👏♥️
"उत्सव सार्वभौमत्वाचा,राष्ट्र, स्वराज्य आणि स्वाभिमानाची धगधगती ज्वाला उरी बाळगुन लोककल्याणकारी राज्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावलेल्या तमाम रयतेचा स्वप्नपूर्तीदिन श्री शिवराज्याभिषेक सोहळा"🙏🏻🚩💐🍃
.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनभिषेक उत्सव श्री शिवराज्याभिषेक सोहळा,६ जून (तारखेनुसार)
.
.
✍️
शिवराजाभिषेक भाग_पहिला✍🏼

शिवराय मंचावर बसले होते...🙏

सर्व राणीवसा चिकाच्या पडद्याआड बसलेल्या होत्या...सदरेवर सर्व मंत्रीगण हजर होते.....
सर्व जण भुषणांचे छंद ऐकण्यासाठी आतुर झाले होते...

कविराज भुषण यांनी..श्री गणेशाचे नमन केले आणि छंद बोलण्यास सुरुवात केली...

" चंदन मै नाग , मद भरयो इंद्र नाग , विष कहे सेसनाग कहै उपमा अबस को ?
भोर ठहरात न कपूर बहरात , मेघ सरद उडात बात लागे दिसि दस को ||

शंभु नीरग्रीव भोर पुंडरीक ही बसत , सरजा सिवाजी सन भुषण सरस को ? छीरधि मै एक पंक , कलानिधि मै कलंक ,
याने एक टंक ए लहै न तव जस को....||"

अर्थात- चंदनात नाग आहे , इंद्राच्या गजेंद्रात मदाचा दोष आहे , शेषनाग विष भरलेला आहे , जसे शरद ऋतू पुढे मेघांचे चालत नाही , भगवान शंकर शुभ्र वर्णाचे तरी त्यांचा कंठ निळा आहे , कमळ भोवर्यात राहतो , क्षिर समुद्रात सुद्धा चिखल आहे ,
चंद्र मोठा आहे तरी सुद्धा तो कलंकी आहे....
हे सरज्या शिवाजी महाराज आपल्या निष्कलंक यशा प्रमाणे निर्दोष असे काहीच नाही...."

राजे म्हणाले...

" कविराज !! आपण उत्तरेतून आलात , या मुघलांच्या , यवनाच्या अत्याचार ला प्रत्यक्ष आपण बघितले आहे..."

कविराज म्हणाले..

" जी राजन..!!
देवल गिरावते फिरावते निसान अली ऐसे डूबे राव राने सबी गये लबकी। गौरा गनपति आप औरनको देत ताप अपनी ही बार सब मारि गये दबकी ॥ पीरा पयगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्धकी सिद्धाई गई रही बात रबकी । कासी हूकी कलाजाती मथुरा मसीत होती, सिवाजी_न_होतो_तो_सुन्नत_होत_सबकी..."

राजेंनी डोळे मिटून आपला हात छातीवर नेत मुखातून जगदंब वदले...🚩

कविराज म्हणाले......✍️

" राजन अब धर्मसुर्य का तेज आपके सिवा कोई नही बचा सकता... राजन... महाराणा_प्रताप , प्रुथ्विराज_चौहान जैसे विर योद्धाओ की इस भुमी को इन कपटी लुटेरो ने अपने पैरो से अपवित्र कर दिया है !!
राजन अब हल्दिघाटी के रण मे चेतक की टापो की आवाज तो सुनाई देती है पर महाराणा प्रतापजी नही !!
बस्स उनकी झलक आपमे दिखती है राजन !!! "....
.
.
.
क्रमशः...........✍️
.
.
✍🏻अक्षय चंदेल (लेख अधिकृत)
✍🏼🚩
शिवराजाभिषेक भाग_दोन ✍️

मोरोपंत उभे राहिले...आणि म्हणाले...

" महाराज काशी वरून एक विद्वान ब्राह्मण आपल्या भेटीला स्वराज्यात येत आहेत.... सध्या ते नाशिक पर्यंत आलेत.... "

महाराज म्हणाले... " आमच्या भेटीला ???"

मोरोपंत म्हणाले...
" होय महाराज !!! विश्वेश्वर भट्ट म्हणजे गागाभट्ट....
कलयुगाचे ब्रम्हदेव च म्हणतात त्यांना.... "

"कायास्थधर्म दीपिका 'निरूढ पशुबंधप्रयोग,'भट्टचिंतामणी,'मीमांसाकुसुमांजली
,'राकागम ,'समयनय ,सुज्ञानदुर्गोदय...."
इत्यादी ग्रंथ संपदा त्यांनी लिहिलेली....त्यांचे मुळ घराणे पैठण चे....महाराष्ट्र चे.....आपली किर्ती ऐकून ते आपणास भेटण्यासाठी येत आहेत...

त्यांचे पुर्वज कमलाकर भट्ट हे बावीस ग्रंथांचे कर्ते होते...""

"व्वाह !!! एवढे विद्वान आम्हाला भेटायला येत आहेत...
आमचे भाग्य..."
साधु , संत येती घरा तोची दिवाळी, दसरा....अनाजी !!
त्यांच्या साठी खासे सरंजाम पाठवा....आदराने रायगडावर आणा !!! "

रायगडावरून सरंजाम पाठवण्यात आले...
गडावर तयारी सुरू झाली.... गागाभट्ट गडावर येणार आहेत....

तिकडे सुळाची अग्नी डोळ्यात साठवून बहलोलखान फौजा जमवत होता....

स्वाराकडे आपली काळी नजर ठेवून होता..

चाळीस हजार फौज बहलोलखानाने गोळा केली होती....

तिकोटा ला तळ ठोकून बसलेला खान जवळच्या प्रदेशात धुमाकूळ घालत होता...

लहान मुलांच्या किंकाळ्या कानावर पडत होत्या , आयाबहिणींच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता....
खानाने अत्याचार च्या सिमा पार केल्या होत्या...

प्रतापरावांना हे सहन होत नव्हते ...
" आपण खानाला धर्मवाट दिली आणि खान स्वराज्यावर च उलटला , विषारी साप हा , या यवनांवर विश्वास करनेच चुकीचे , पिसाळलेल्या कुत्र्याला , सोडले की तो चावा घेतो हे.नक्की !!!!"....

क्रमशः

✍🏻अक्षय चंदेल ( लेख अधिकृत)
@chandel638

शिवराज्याभिषेक_सोहळा
२०२४ लवकरच........✍️🚩
✍️
यवनाच्या छाताडावर भगवा रोवणारे, अफझलखानी राक्षस फाडून फेकणारे, शाहिस्त्याची बोटं कापणारे, आणि भरदरबारात औरंग्यासमोर सिंहगर्जना करणारे भोसले कुलदिपक शिवराय... गागाभट्टांच्या डोळ्यांसममोर होते.

शिवराजाभिषेक भाग_तीन ✍️ 🚩

गागाभट्ट यांची पालखी जवळ महाडशेजारी आलेली होती....
दुसऱ्या दिवशी राजे गड उतार झाले..

खासे गड सुशोभित झाले होते , जगदिश्वराच्या मंदिर लगत गागाभट्ट यांची राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती...

गागाभट्ट जवळ आले कळताच , राजे आपल्या मंत्री सह त्यांच्या स्वागतार्ह सामोरे गेले....

राजे येत आहे हे कळताच पालखी थांबली... गागाभट्ट पालखीतून बाहेर आले....

अंगावर लाल जरीकाम असलेली शाल , पांढरा शुभ्र लाल काठांचा धोतर , मस्तकी शिवगंध रेखाटलेले , गळा आणि हातावर भस्म पट्टे , चेहऱ्यावर पावित्र्यतेचे स्मित उमटलेले...

खरच गागाभट्ट म्हणजे वेदनारायाणच , वेदोक्त विश्वेश्वरभट्ट , गागाभट्ट....
आणि आपला हात नतमस्तक झालेल्या शिवरायांच्या डोक्यावर आशिर्वादाला उठला..

" सर्वे भवन्तु सुखिनः " गागाभट्टांनी आशिर्वाद दिला... फक्त राजेंना तर नाही... अवघ्या स्वराज्याला..

आणि राजे उभे राहिले..
गागाभट्टांची नजर राजेंना बघत होती.

" यवनाच्या छाताडावर भगवा रोवणारे ,
अफझलखान सारखा राक्षस फाडून फेकणारे ,
शाहिस्तेखानची बोटं कापणारे ,
प्रतापगडावर भवानी मातेची स्थापना करणारे ,
सुरतेची वैभवश्री दोनदा बेसुरत करणारे ,
सप्तकोटीश्वर मंदिराला पुनरुज्जीवन देणारे ,
हेच काय तर भर दरबारात औरंगजेब समोर सिंहाची गर्जना करणारे भोसले कुलदिपक शिवराय...
" गागाभट्टांच्या समोर उभे होते..

जे कोणीही करु शकले नाही ते सरज्या शिवाजी महाराजांनी केले होते.

मुघलाई तख्ताला पार हादरवून टाकले होते..⚔️

शिवरायांच्या रुपाने या पारतंत्र्यात एक नवीन आशेचा किरण उगवत होता... किरण नव्हे..

शिवरायांच्या रूपात स्वतंत्रतेचा सुर्य उगवत होता..

"सुलतानी सत्तेशी वैर म्हणजे अंतच, दिल्ली चा तख्तेश्वर म्हणजे , जणू जीवनाशी वैर...हा वैर घेणे सोपे सहज नाही..

एका हिंदू व्यक्ती ने काही तरी चुक केली म्हणून त्याला शिक्षा म्हणून एक लोखंडी मेख त्याच्या पार्श्वभागी तेव्हा पर्यंत ठोकल्या गेली , जेव्हा पर्यंत ती आरपार होत नाही..
हे एक उदाहरण पुरेसे आहे..
अत्याचार च्या परिसीमा किती गाठल्या हे सांगायला.."

जिजीया कर , मंदिर पाडल्या गेले , आयाबहिणींच्या आब्रुचे धिंडवडे उठल्या गेले....पण पण हे सर्व बदलण्याचा क्षण जवळ येत होता..

क्रमशः

✍🏻अक्षय चंदेल ( लेख अधिकृत)
@akshay_chandel_21
.
© @nileshsonkar
✍️
भाग_पाच शिवराजाभिषेक_सोहळा🚩

गागाभट्ट बोलत होते...
अवघी सदर ऐकत होती...
शंभुराजेंचे लक्ष एकटक गागाभट्टांच्या शब्दाकडे खिडले होती...

गागाभट्ट म्हणाले...
" महाराज , काशी चे विश्वेश्वर त्या औरंगजेब ने पाडले... कोणीही त्यास रोखले तर काय ,
साधे विरोध सुद्धा केले नाही.... आमच्या पुरातन शहरांची नावे सर्रास बदलत गेली...तलवारी च्या टोकावर धर्मांतर झाली आणि आम्ही सहिष्णुतेचा कळस घेवून , पारतंत्र्याची प्राणप्रतिष्ठा करत बसलो , महाराज ओम गेले ओमकार गेले , सकाळी ऐकू येणाऱ्या भूपाळ्या ऐकू येईना झाल्या...गायीच्या वासरांचे हंबरडा ऐकु येईना,
आंधळ्या विश्वासाने परकीय आक्रमकांनी आम्हाला आमच्याच भूमीवर गुलाम बनवून जनावरांप्रमाणे जुंपले... "

जिजाऊंच्या डोळ्यात अग्नी पेटली होती....
पुन्हा स्वराज्य निर्माणतेचे स्वप्न पुढे उभे राहिले होते...

गागाभट्ट बोलत होते...

" महाराज !!
आई देखत लेकीवर आणि लेकीदेखत आई वर अत्याचार झाले , आमच्या सहनशीलतेला तप्त अग्नीचे सदैव...
सदैव चटके दिल्या गेले... लहान लहान मुलांच्या..सुद्धा हत्या केल्या, काफर काफर म्हणत...उघड्या डोळ्यांनी कत्तल बघाव्या लागतात..." महाराज!!
आता फक्त आपणच हे थांबवू शकतात...!!

शिवरायांच्या डोळ्यात अग्नीचे दाह पेटले... ओठ थरथरत फक्त एकच शब्द बाहेर पडले....

" आचार्य...!!"
आणि गागाभट्ट म्हणाले..

" होय महाराज !!
आपला हात रयतेच्या डोक्यावर आणि आपल्या डोक्यावर छत्र व्हावे... महाराज आपण "छत्रपती" व्हावे...!!"

तेवढ्यातच डोक्यावर घाम सुटले अंग थरथरत कविराज भुषण पुढे आले... आणि अवघ्या रायगडाच्या अंगावर काटा उभा राहिला... भुषणांचे शब्द बाहेर पडले...

"इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर,
रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं।
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर,
ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥
दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर,
'भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं।
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर,
त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥"

गागाभट्ट म्हणाले...
" अगदी सत्य आहे महाराज....जंभासुरावर इंद्र , श्री राम जसे लंकापती रावणावरी
मेघावर पवन ते , शंभुमहादेव जसे कामवरी
दुशासनावर भिमवज्र , श्री कृष्ण जसे कपटी कंसावरी...
हे भोसले राजे शिवाजी नरसिंह आपण तसे म्लेंच्छ वंशावरी...."

आपण सिंहासनाधिश्वर व्हावे महाराज आपण छत्रपती व्हावे....
.
Pic @atifpachapuri
.
क्रमशः

@akshay_chandel_21
✍🏻अक्षय चंदेल ( लेख अधिकृत)
✍️
शिवराजाभिषेक भाग_सहावा ✍️

अवघ्या रायगडावर राज्याभिषेकाची लगबग सुरू होती...
जिजाऊ मासाहेब या शुभक्षणाच्या चाहुलीमध्ये आपली तब्येत वगैरे सर्व विसरून गेल्या....

राज्याभिषेक या शब्दाने स्वराज्याला नवजीवन दिले....
सलग तीस वर्षे मावळे लढत होते , आपल्या राजा साठी, स्वराज्यासाठी, देव देश आणि धर्मासाठी....
सर्वांचे जीवन सार्थक होणार होते...
" सरज्या शिवाजी महाराज... छत्रपती होणार होते...."

अवघ्या पाहुण्यांना , सरदारांना , निमंत्रण जात होते...

पण पण एक अडचण होती....
राज्याभिषेक फक्त शुद्ध क्षत्रिय चाच होऊ शकतो... आणि शिवरायांचे क्षत्रियत्व अजून सिद्ध झाले नव्हते...
त्यात खिलजी च्या आक्रमण नंतर महाराष्ट्र मध्ये कधीच राज्याभिषेक झालेला नव्हता...
येथील पुरोहित, ब्राम्हणांना राज्याभिषेक विधी येत नव्हता...

गागाभट्टांनी राज्याभिषेक वर ग्रंथ लिहीण्यास सुरुवात केली....

महाराजांची वंशावळ शोधल्या गेली...

आणि महाराजांची वंशावळ होती ती शुद्ध क्षत्रिय सिसोदिया राजपूत वंशाची...!!

राजांचे क्षत्रियत्व सिद्ध झाले....

रायगडावर राज्याभिषेक ची लगबग सुरू झाली ...
गडावर रंगरंगोटी करण्यात येत होती....
पण दोन दालनात वैद्यांची येजा सुरू होती...

ती दालने होती जिजाऊ मासाहेबांची आणि दुसरे ते शिवरायांच्या धर्मपत्नी काशीबाई राणीसाहेबांची , काशीबाई राणीसाहेबांची तब्येत खूप खालावत होती...

" मासाहेबांचा शिवबा राजा होणार छत्रपती होणार.. !!!"

संध्याकाळी शंभुराजे जिजाऊ मासाहेबांच्या दालनात होते....

मासाहेबांना थोडे अस्वस्थ वाटत , अवघ्या दार खिडक्या झाकलेल्या होत्या ,
मासाहेबांना रायगडावरील वारा सहन होत नव्हता...

शंभुराजे मासाहेबांना म्हणाले....

" आऊसाहेब... आमचे आबासाहेब लहानपणी कसे होते ??"

आऊसाहेब हसत म्हणाल्या...

" शंभुबाळ...!! शिवबा अगदी खोडकर होते...,
लहानगे शिवबा रेंगाळत जायचे आणि आमचे लक्ष हटले की लगेच शिवनेरी ची माती तोंडात टाकत...!!!"

शंभुराजें हसले... सोबत मासाहेब सुद्धा ,....
पण हसता हसता मासाहेबांना जोर्याने खोकला सुरू झाला...
शंभुराजेंनी लगेच पाणी आणले...मासाहेबांना दिले...

मासाहेबांच्या तुळजाऊ डोळ्यातून पाणमोती कोसळले..
शंभुराजेंच्या डोक्यावर हात फिरवून मासाहेब म्हणाल्या...

" शंभुबाळ !!
आजही असे वाटते की , तुमचे आजोबा, आमची स्वारी...
लहानग्या शिवबांना आमच्या कडे घेऊन येत आहेत...!!!"..

क्रमशः :-....................

✍🏻अक्षय चंदेल ( लेख अधिकृत)
@akshay_chandel_21
✍️
शिवराजाभिषेक भाग_४ ✍️

आणि सदर भरली...
जिजाऊ मासाहेब सदरेवर उपस्थित होत्या , राणीवसा आणि सोयराबाई राणीसाहेबांच्या सोबत राजाराम महाराज बसलेले... राणीवसा सोबत येसूबाई राणीसाहेब उपस्थित होत्या...

शिवराय स्थानापन्न झाले...
आणि पुढे गागाभट्ट आपल्या स्थानावर बसले होते....

मोरोपंत उभे राहिले आणि म्हणाले...

" महाराज !!! वेदनारायण श्री गागाभट्ट येथे येण्याचे हेतू सांगण्यास इच्छुक आहे...."

महाराज म्हणाले...
" भाग्य आमचे...!!!"

गागाभट्ट उभे राहिले आणि म्हणाले...
" महाराज !! स्वराज्य ये रायगड , ये सह्याद्री हमे बहोत भाया .....
ऐसा लगता है की शिवसेवक बनकर यही रहे !!!"

महाराज म्हणाले....
" धन्यवाद....आचार्य.!!! "

गागाभट्ट म्हणाले...

" पण महाराज.... आम्ही एका हेतूने इथे आलो आहोत....!!! या पुण्यभूमी वर परकियांनी आक्रमण केले , आपली धर्म , संस्कृती , ही भुमी लुटली, खंडित केली...
आणि तेच परकीय आपल्या वर राज्यकर्ते बनून... अत्याचार करतात !! अलाऊद्दिन खिलजी ने आक्रमण केले आणि देवगिरी ची राजकुमारी उचलुन नेली.... कोणी काय केले ???
काहीच नाही महाराज !!! ,
पण त्या आक्रमण नंतर कोणी हिंदू राज्य स्थिर झालेच नाही ,

कित्येक........
कित्येक हिंदू राज्यकर्तांनी यवनांची मांडलीक स्विकारली पण , आपण "श्री शिवाजी शहाजी भोसले....
" भर दरबारात औरंगजेब च्या मुघल तख्ताची खिल्लत उधडली , सप्तकोटीश्वर सारखे यवनांनी पाडलेल्या मंदिरांचे पुनः निर्माण केले , लक्ष लक्ष अश्वदळ , पायदळ , आपण गजपती आहात पण पण महाराज आपण अजूनही राजे नाही...

का महाराज का ??? "

अवघा दरबार गागाभट्टा़च्या शब्दांनी भरून आले होते... जिजाऊ मासाहेबांच्या ह्रदयाची धडधड वाढली होती... शिवरायांच्या अंगावर शहारे उभे राहिले होते...

गागाभट्ट बोलत होते...

" महाराज , राक्षसासारखा अफझलखान चे कोथळा काढला आपण , खुद्द औरंगजेब चा मामा शाहिस्तेखानची बोटं कापली , तोरणावरुन स्वराज्याचे तोरण बांधून आज आपण कित्येक गडांचे गडपती आहात , फक्त भूमीवर च नाही तर जलदुर्ग , आरमार बांधून आपण समुद्रावर सुद्धा वर्चस्व प्रस्थापित केले...,

ज्या औरंगजेब च्या मगरमिठीतुन खुद्द दिल्ली चा बादशहा शहाजहान सुटू शकला नाही , त्याच्या हातावर तुरी देत आपण परतले.... महाराज आपण नरसिंह आहात पण आपण हिंदुपदपातशाह व्हावे हिच आमची इच्छा...."

....क्रमशः
C
✍🏻अक्षय चंदेल ( लेख अधिकृत)
@akshay_chandel_21
.
.
.
.
शिवराज्याभिषेक_सोहळा
२०२४
लवकरच........✍️🚩
2024/05/26 00:13:55
Back to Top
HTML Embed Code: