Telegram Group Search
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*जे मिळवायचं आहे फक्त त्याचाच विचार करा, एक नाही दहा मार्ग सापडतील...*_

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर नि:सकोच विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की तो इतकं देणार, की मागायला काहीच उरणार नाही.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
_*छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारशक्तीचा आणि दूरदृष्टीची कोणीच कल्पनाही करू शकत नाही. असा अभूतपूर्व स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण म्हणजे किल्ले रायगडावरील महादरवाजा व त्याच्या पायऱ्या.*_

*🚩#ऊर्जा_छत्रपती*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*आपल्या यशाच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ वाढवायचं असेल तर कष्टाच्या त्रिज्येची लांबी वाढवावी लागते.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!!🙏🏻🚩


जय सिताराम🚩जय हनुमान
*🚩 #प्रेरणास्थान*

_*यशामागचे कष्ट हे फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहीत असतात.*_

*🚩 #दैवत_छत्रपती_शिवशंभू*
_*मित्र जोडावेत छत्रपती शिवरायांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल. मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल..!*_
इतिहासात अनेक शूर व धाडसी व्यक्ती तसंच विरक्त-वैरागी मंडळीही होऊन गेली त्यातले द ग्रेट मराठा महाराजा महादजी शिंदेंचे सेवक राणेखान..🚩

२४ एप्रिल १७८८, रोजी भरतपूरजवळील राणेखानची लढाई..

पानिपतच्या पराभवानंतर त्याचा बदला चुकवायला अकरा वर्षे लागली अन् तो बदला दिल्लीवर नियंत्रण मिळवित महादजी शिंदेंनी चुकता केला. यात त्यांना राणेखानाची मोलाची साथ मिळाली. अनेक लढाया अन्‌ कुरघोड्या मोडून काढण्यात राणेखान वस्ताद होते. १७८७ मध्ये जयपूरचा राजा प्रतापसिंग व महादजी शिंदे यांच्या लढाईत सरदार राणेखान सहभागी होता. महादजी शिंदे उत्तर हिंदुस्थानांत प्रबल झाला तेव्हा गुलाम काद‌‌िरच्या छळापासून बादशहाची मुक्तता करण्याकरिता इ.स.१७८८ साली राणेखानास दिल्लीस पाठविले होते. गुलाम का‌‌द‌िर व इस्मायलबेग यांनी दिलेला आग्र्याचा वेढा उठवून दोन्ही सैन्यांत २४ एप्रिल १७८८ रोजी भरतपूरजवळ झालेल्या लढाईत त्यांचा पराभव करण्यात १७८८ मध्ये सरदार राणेखानाचा पराक्रम मोठा होता..

अनुपगीर गोसावी म्हणजे हिंमतबहादूर गोसावी. दिल्लीच्या शहाअलमने त्याला राजा हिंमतबहाद्दर ही पदवी दिली होती. कुरापतींसाठी प्रसिद्ध असलेल्या अनुपगीरने गोसाव्यांचें एक छोटेसे सैन्य तयार केले होते. गोसाव्यांचा सरदार म्हणून तो प्रसिद्ध होता. त्याने आपल्या कुरापतींमुळे अयोध्येचा नबाब, होळकर, बुंदेलखंडचा अलीबहाद्दर, नाना फडणिस, दत्ताजी शिंदे, जयपूरकर, जोधपूरकरकरांना देखील हैराण केले होते. अनुपगीरला शरण आणण्याची कामगिरी राणेखानाकडे सोपविण्यात आली. १७८९ मध्ये राणेखानाने त्याचा बंदोबस्त करीत पाटीलबाबास शरण आणले. तसेच बादशाहीला हैराण करणाऱ्या गुलाम कादिरच्या बंदोबस्तामुळे मराठ्यांची गेलेली पत व प्रतिष्ठा परत मिळून उत्तरेत त्यांचा वचक पूर्ववत बसला, हे श्रेय महादजी अर्थातच राणेखानाचेच. अलीगडचे पूर्वीचे नाव रामगड असून, नजीबखान रोहिल्याने ते बदलले असा उल्लेख गोविंदराव पुरूषोत्तम यांच्या १७८३ च्या पत्रात आढळतो. पत्रात ते म्हणतात, नजीबखानानें ज्या रामगडचे अलीकडे अलिगड म्हणोन नांव ठेविले आहे, तेथें जाऊन किल्ला खालीं करून पादशाही (हिंदूशाही) अंमल बसवावा असा राणेखान व रायाजी पंत यांचा विचार आहे..

: संदर्भ राजवाडे खंड-१२.
स्वराज्याची निर्मिती आणि विस्तार करताना शिवबांना अनेक विर मावळ्यांची, सवंगडयाची साथ लाभली असे साथीदार की ज्यांनी स्वराज्यासाठी त्याग, निष्ठा, समर्पण ही त्रिसूत्री आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक च बनवली होती. अशाच अनेक विरांनी इतिहास घडवला. त्यापैकी महराजांचा तिसरा डोळा म्हणून ओळखणारा गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’..🙏🚩

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेत गुप्तहेर खात्याचे महत्वपूर्ण आणि मोलाचे काम असे या शिवाय हे गुप्तहेर खाते प्रत्येक किल्ल्यावर व प्रत्येक सुभ्यावर हि कार्यरत असे ते खाते आपल्या बातमीदाराव्दारे तेथील आधिकारी आणि कामकाजाबद्दलची माहिती शिवरायांपर्यंत देत असे..

या गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’ होते आणि ते इतिहासाला माहिती आहेतच पण त्यांच्या व्यतिरिक्त रावजी, सुंदरजी, कर्माजी, विश्वास मोसेखोरे आणि विश्वास दिघे असे पाच गुप्तहेर होते परंतु शिवरायांच्या या गुप्तहेर खात्यातील एवढ्याच लोकांची नावे माहिती आहेत पण यांच्या बद्दलची संपूर्ण माहिती अजूनही इतिहासात आढळत नाही ती माहिती गुप्त आहे आणि हे शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे यशच आहे कारण महाराजांच्या सैन्यात असणार्यांना गुप्तहेरांची माहिती कळू शकली नाही ती गनिमींना कशी समजणार..

सुरवात होते, १६४२ पासून शिवबांनी नुकतेच पुण्यात आपले राज्य वाढवण्यास सुरुवात केलीली असते. जिजाऊसाहेब राज्यकारभार पाहत असतात. त्याच सुमारास एक रामोशी समाजातील दौलतराव नावाचा मुलगा फक्त शिवाजी महाराजांना पाहता यावे या इच्छेने चौदा, पंधरा लांडगे मारून त्यांच्या शेपट्या कापून लाल महालात पोहचतो. प्रथम भेटीतच आई जिजाऊ साहेब त्याची पारख करतात. त्याचे कौतुक करतात. तुम्हाला सोबत म्हणून एक अनमोल रत्न गवसल्याचे शिवबांना सांगतात. त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून राजे त्याला गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतात. कान्होजी जेधे सारखे गुरु मिळताच रामोशी दौलतरावाची एका गुप्तहेर संघटना प्रमुखात रूपांतर होते की खुद्द शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा ही उपमा त्यांना शोभून दिसते..
इथुन पुढे वाटचाल सुरू होते, दौलतराव ते बहिर्जी नाईक या प्रवासाची. स्वराज्याच्या कार्यासाठी बहिर्जी नुसते इस्लाम धर्म स्विकारत नाही तर रहिम बाबा होउन कुणालाही शंका येणार नाही इतका अंगात भिनवून घेतात. हृदयात मात्र अखंड शिवज्योत तेवत असते. परिवाराचा त्याग करतात गरोदर पत्नीची काळजी ईश्वरावर सोपवतात. स्वराज्यासाठी स्वतः ला संपूर्ण समर्पित करत असतांनाच आपल्या सारखे तिन हजार बहिर्जी घडविण्याचे कार्य करतात. एक एक अस्सल हिरा शोधुन काढतात. त्या काळातील गुप्तहेर संघटनेची बांधणी, जागोजागी निर्माण केलेली गुप्तस्थळे, शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रत्येक हेराला दिले जाणारे शिक्षण हे वाचुन अचंबित होतो. हेरखात्यात स्त्रीयांचा समावेश पाहुन स्त्री शक्तीची जाणीव होते. कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान नसताना एक शिस्तबद्ध सघंटना कशी उभी राहते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बहिर्जी नाईक यांची गुप्तहेर संघटना होय..!
महाराजांच्या हेर यंत्रणेचा विचार केला तर प्रामुख्याने नाव पुढे येते ते बहिर्जी नाईक यांचे. सुरतेची मोहीम व जालनापूराच्या लूट मोहिमेनंतर पट्टागडाकडे प्रयाण, या दोन्ही ठिकाणी बहिर्जी नाईकांचे उल्लेख कागदपत्रात आले आहेत. त्यामुळे बहिर्जी नाईक ही ऐतिहासिक व्यक्ती होती याची खात्री पटते. सुरतेच्या मोहिमेबाबत (दुसरी वसुली) बहिर्जी नाईकांनी सुरतला गुप्तपणे भेट देऊन तेथील पूर्वपाहणी केली होती असे सभासद बखरीत म्हटले आहे. महाराजांच्या कार्याची व्याप्ती लक्षात घेता त्यांचे हेर खाते हे एका व्यक्तीवर पूर्णपणे अवलंबून असणार नाही हे निश्चित. त्यामुळे त्यांचे हेर खाते ही एक वेगळी यंत्रणा असून बहिर्जी हे त्यातील प्रमुख व्यक्ती असतील असे वाटते. सुरतेच्या पूर्वपाहणीतही त्यांच्या बरोबर अन्य व्यक्तीही सहाय्यक म्हणून असतील. दोन्ही मोहिमांच्या जाण्या-येण्याचे मार्ग ठरविण्यात बहिजींचा मोठा वाटा असावा असे वाटते. अर्थात अंतिम निर्णय महाराज स्वतःच घेत असतील. बहिर्जी स्वतः रामोशी समाजाचे होते. त्यामुळे भिल्ल, कोळी, रामोशी इत्यादी डोंगर-दऱ्यात, अरण्यात राहणाऱ्या जमातींशी विशेषतः त्यांच्या प्रमुखांशी बहिजींचे चांगले संबंध (contacts) असतील. किंबहुना त्यांनी ते प्रयत्नपूर्वक जोपासले असतील असे वाटते. महाराष्ट्रात पठारी प्रदेश व कोकण किनारपट्टी यांना जोडणाऱ्या अनेक घाटवाटा आहेत. या वाटांचेही ते चांगले जाणकार असले पाहिजेत. दोन्ही वेळेला जाताना महाराजांची फौज जव्हार व रामनगरच्या कोळी राज्यातून गेली होती. येथील राजांशी बोलणी करून त्यांची मदत मिळविण्याचे मोलाचे काम बहिजींनी केले असावे. परत येताना मात्र या राज्यांमधून कमीत कमी प्रवास करावा लागेल याची दक्षता घेण्यात आली आहे..
.
थेवेनो (Thevenot) या परदेशी प्रवाशाने असे म्हटले आहे की महाराज स्वतः फकिराच्या वेषात सुरतेला गेले होते व त्यांनी तेथील माहिती काढली होती. ही अर्थातच अविश्वसनीय गोष्ट आहे. याचा असा अर्थ घेता येईल की बहिर्जी व त्यांच्या बरोबरची मंडळी वेगवेगळ्या वेषात मोहिमेपूर्वी सुरतेत वावरली असावीत..
.
अत्यंत गुप्तपणे विश्वासाने आणि अचूक कामगिरी करणाऱ्या शिवरायांच्या गुप्तहेर खात्यास आणि या खात्यातील प्रत्येक हेरास आणि बातमीदारास मानाचा मुजरा..
.
――――――――――――
बागलाणची शान परिसरात साल्हेर वरुन दिसणारा सह्याद्रीच्या मस्तकावर ऐटीत साक्ष देत उभा असलेला किल्ला सालोटा...🚩

इतिहासाबरोबरच इथल्या दुर्गांची दुर्गबांधणी हा एक अभ्यासाचाच वेगळा विषय आहे अनेक राजवटी नांदल्या, आणि या वेगवेगळ्या कालखंडात इथे भरपूर गडकिल्यांची उभारणी केली गेली किल्ले उभारताना वेगवेगळ्या दृष्टीकोनातून, कल्पकतेने निरनिराळे प्रयोग राबवून या दुर्गांची उभारणी केल्याचे आपल्याला दिसून येते...

शिवकाळातील गडकोटांचे महत्त्व सांगून जातात राज्याच्या संरक्षणासाठी, आक्रमण काळात, राज्यसंरंक्षणाच्या दृष्टीने, या किल्ल्यांचा खूप मोठा उपयोग झाला आहे म्हणूनच एकप्रकारे गडकोट राज्याचा खजिना होते राजलक्ष्मी होते प्राणापलिकडेही जपलेले आणि बांधलेले हे गडकिल्ले पवित्र होते वंदनीय होते...

“सह्याद्रीने भटक्यांना जगावे कसे ते शिकवले आणि मरावे कसे ते हि शिकवले एकदा बघावे त्याच्या उत्तुंग शिखरांकडे अशी शिखरे की जी एकेकटीचं आकाशाशी झट्या घेत आहेत...”

📷 @shree__kala 👌🏼♥️🔥
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*स्वप्नांच्या क्षितिजाला कुठलेही बंधने नसतात. फक्त झेप घेतल्यावर नाळ मातीशी ठेवा.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
🚩
छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती विषयक धोरण

ज्याच्याकडे शेत कसण्याची कूवत आहे, मनुष्यबळ आहे पण मशागतीस बैलजोड़ी नाही, बी – बियाणे नाहीत त्याला दोनचार बैल देण्यास रोख रक्कम द्यावी किंवा सरकारातून बैल आणि बी – बियाणे द्यावेत.

● शेतकर्यास सरकारातून दिलेले कर्ज वाढीव पद्धतीने वसूल न करता त्याच्या शेतीचे उत्पन्न तयार झाल्यावर त्याच्या कुवतीनुसार हप्त्याने वसुल करावे.

● गावचा गाव फिरून तेथील शेतकरी जेवढे आहेत ते गोळा करावे कोणाकडे मनुष्यबळ आहे, बैल आहेत यांची कोणाकडे कशी व्यवस्था आहे याची विचारपूस करावी

.● नवीन शेतकर्यास सोईसवलती देऊन पडिक जमीन लागवडीखाली आणावी त्यासाठी सरकारने रक्कम मंजूर करावी.

● ज्या शेतकर्यावर सरकारची मागील बाकी येणे आहे पण त्याच्याजवळ काहीच नाही अशा शेतकर्यास जर तो शेती करण्याची अजूनही उमेद धरत असेल तर त्यास सर्व प्रकारची मदत करावी. त्याच्यावरील कर्ज माफ़ करण्यासारखे असेल तर तसे कळवावे.

शेतकऱ्यांना सोईसवलती देणे, कर्जमाफ़ी देणे ही सेवा आहे पण शेतकरी कर्जबाजारी होऊ नये हे परिवर्तन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवले ते परिवर्तन आज घडण्यासाठी शिवाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणांचा विचार करायला हवा.

शिवराय_असे_शक्तीदाता
प्रथम हाती धरा नांगर नंतर चालवा तलवार..
आधी भरा पोट आणि मग करा गनिमावर वार...

अर्धपोटी सैन्य कधीच प्राणपणे लढा देऊ शकत नाही हे ओळखूनच भूमिपुत्राच्या हातात प्रथम नांगर देऊन त्यांना पोटाला लावत स्वराज्य स्थापणारे छत्रपती शिवराय हे एकमेवच..!

――――――――――――
🎨 @rambdeshmukh 👌🏼♥️🔥
औरंगजेबाच्या तंबुचा कळस कापून नेणाऱ्या विठोजीराव चव्हाण यांचे पराक्रमी पुत्र सेनापती हिम्मतबहाद्दर उदाजीराव चव्हाण..🚩

हिम्मतबहादर उदाजीराव चव्हाण (१६८०-२४ नोव्हेंबर १७६२)..

उदाजीराव चव्हाण यांचा जन्म १६८० मध्ये झाला, उदाजीरव हे डिग्रजकर चव्हाण घराण्यातील, सरसेनापती संताजी घोरपडे यांना मदत करणाऱ्या हिम्मत बहाद्दर विठोजी चव्हाण यांचा हा पुत्र होता. या चव्हाण घराण्याचे मूळ पुरुष बालोजी. त्यांचे पुत्र राणोजीराव चव्हाण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महत्त्वाचे सरदार आणि लष्करात मोठ्या हुद्दयावर काम करत होते..

राणोजीरावांनी महाराजांसोबत बऱ्याच मोहिमांत भाग घेतला होता. सुरतेच्या स्वारीत राणोजीराव होते, असा उल्लेख सापडतो. नंतर सिद्दी जोहरच्या जंजिरा मोहिमेत लढत असताना ते धारातीर्थी पडले. त्यांचे दोन पुत्र होते पैकी मोठे विठोजीराव व धाकटे मालोजीराव. विठोजीराव वयाने साधारण १८ वर्षांचे असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सरदार बनवले व त्यांना एका तुकडीवर लष्करी अधिकारी नेमून स्वराज्य सेवेत सामावून घेतले. महाराजानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीतही विठोजीरावांनी लष्करी सेवा इमानेइतबारे पार पाडली..

दक्षिणेतील आदिलशाही, कुतुबशाही व मराठय़ांचे स्वराज्य संपवण्याचे ठरवून औरंगजेब १६८१-८२ सालात दक्षिणेत उतरला. औरंगजेबाला मराठय़ांनी सलग ८ वष्रे स्वराज्यातील एकही किल्ला जिंकू दिला नव्हता. मोगलांनी १६८९ साली दगा करून संभाजी महाराजांना संगमेश्वर मुक्कामी पकडून औरंगजेबाच्या हवाली तुळापूर येथे दिले. तिथे औरंगजेबाने त्यांचे हाल करून क्रूरपणे हत्या केली. याचा राजा असलेल्या संताजी, बहिर्जी, मालोजी घोरपडे आणि विठोजीने औरंगजेबाचा सूड घेण्याचे ठरवले. हे घोरपडे बंधू व विठोजीने निवडक १५० शिलेदारांसह तुळापूर मुक्कामी असलेल्या औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केला, पण औरंगजेब त्याच्या तंबूत सापडला नाही. त्यामुळे चिडलेल्या संताजी व विठोबानी तंबूचे तणाव घाव घालून तोडले, तंबू खाली पडला तेव्हा त्यांच्या खांबावर असलेले दोन सोन्याचे कळस काढून घेतले. परतताना त्यांनी सिंहगडाचा पायथा गाठला. तिथे किल्लेदार असलेल्या सिद्धोजी गुजर यांनी या लष्कराची सर्व सोय केली..
त्याच वेळी मोगल सरदार झुल्फीकारखान कोकणातून लूट घेऊन पुण्यास जात असताना त्याच्यावर हल्ला करून घोरपडे बंधूंनी त्यांचा पराभव केला व सर्व खजिना लुटला आणि तीन हत्ती काबीज करून हे सर्व पन्हाळगडावर छ. राजाराम महाराजांना सादर केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या महाराजांनी घोरपडे बंधूंना ‘ममलकतदार-ए-िहदूराव’ हा किताब दिला आणि विठोजीना ‘हिम्मतबहादर’ असा किताब, शिक्के व कटय़ार देऊन सन्मान केला. कर्नाटकात युद्ध सुरू असताना महानगर ऊर्फ बंगलोर इथे २२ मे १६९९ रोजी विठोजी मारला गेला. नंतर त्याचा पुत्र उदाजी याला राजाराम महाराजांनी हिम्मतबहादर पदाची वस्त्रे दिली. तालुका विजापूर व ठाणे मनगुत्ति वगैरे अठरा परगणे ,शिरोळ रायबाग वगैरे जहागिरी यांच्याकडे होत्या..
.
१७३२ रोजी सगुणाबाई निंबाळकर वहिदूराव घोरपडे यांना छत्रपती शाहूंची जी आज्ञापत्रे पाठविण्यात आली त्यात उदाजीरावांना ‘हिम्मतबहादर’ व ‘ममलकतदार’ असे दोन किताब लावलेले दिसतात. पैकी हिम्मतबहादर हा किताब जुना आहे. उदाजीही त्यांच्या पूर्वजाप्रमाणे पराक्रमी होते. शाहू आल्यावर ताराबाईंच्या पक्षात जाऊन ते बत्तीस शिराळ्यात गढी करून राहिले होते. उदाजी व दामाजी थोरात हे सातारा प्रांतापर्यंत स्वारी करत व चव्हाणचौथाई वसूल करत, गाव वसुल असा कार्यक्रम सुरूच होता. शत्रूच्या मुलखातून जबरदस्तीने चौथाई वसूल करण्याची मूळ कल्पना शिवाजी महाराजांची..! परंतु ही चौथाई प्रत्यक्ष स्वराज्यात उदाजीराव चव्हाण वसूल करत असल्याने त्याला कुचेष्टेने चव्हाण चौथाई असे नाव मिळाले होते, असे उल्लेख कागदपत्रात आहेत. याचा त्रास एवढा जाणवत होता की, त्या त्या प्रांतातील सरदारांनाही या अरिष्टनिवारणार्थ आपापल्या प्रजेवर ‘चव्हाणपट्टी’ असा एक स्वतंत्र कर लादला होता, आणि त्या पैशातून ते फौजा बाळगून उदाजीरावांशी लढा देत..
महाराणी ताराबाई राणी सरकार यांच्यातर्फे सेनापती चंद्रसेन जाधवराव यांच्या सोबत छत्रपती शाहू महाराजांशी यांनी लढा दिला, यांची गाधी बत्तीस-शिराळ्यास होती, शाहू महाराजांनी उदाजीरावास कैद केले होते परंतु वारणेच्या तहानुसार ते परत कोल्हापूरकर छत्रपती यांच्याकडे गेले. उदाजीरावांचे चुलते मालुजी चव्हाण यांना इ.स.१७३८ मध्ये डिग्रज हा सरंजाम म्हणून शाहूमहाराजांकडून मिळाला होता. शिवाय कर्नालपैकी निम्मा गाव त्यांना पालखीच्या खर्चासाठी शाहूंनी इ.स.१७४४ साली दिला होता. मिरज प्रांतापैकी फक्त हे दीड गाव आता या घराण्याकडे चालू राहिले..
.
हिम्मतबहाद्दर विठोजीराव चव्हाण यांना छत्रपती थोरले शाहु महाराज यांनी परळी ता बीड येथे देशमुखी दिलेली होती. त्यांचे वंशज परळी, वाला, हातोला व बिटरगाव येथे आहेत. ते आज चव्हाण देशमुख लावतात..
.
अशा या पराक्रमी उदाजीरावांचा मृत्यू नेमका कसा झाला याची खात्रीलायक माहिती नाही. मृत्यूबाबत पहिला उल्लेख कै. रथाजीराव चव्हाण यांनी आपल्या कैफियतीत यासंबंधी जो मजकूर लिहून ठेवला आहे त्यानुसार इ.स.१७६२ च्या नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात या विरण्यात योद्धयाचा एका लढाईत अंत झाला. अक्कलकोटकर व हिम्मतबहादर यांचे एका हद्दीच्या गावाबद्दल कलह चालू होता. तेथे लढाई झाली त्यात उदाजीराव ठार झाले..
.
#रणमार्तंड_मराठे
———————————
🎨 @37omkar 👌🏼♥️🔥
2024/04/26 02:56:45
Back to Top
HTML Embed Code: