tg-me.com/shrimantyogi1/3281
Last Update:
दोन्ही सैन्य एकमेकांना भिडली. यात पोर्तुगीजांची सरशी झाली मात्र युद्ध इथे संपले नाही. आत त्याहून मजबूत दरवाजा होता. तोही कुलपी गोळ्याने उडवण्यात आला. किल्लेदार, किल्ल्यावरचे लोक, अंमलदार यांना पोर्तुगिज सैन्याने अक्षरशः कापून काढले. यावेळी या सैन्याने क्रूरतेची परिसीमा गाठल्याचा उल्लेख पोर्तुगीजांनीच आपल्या पत्रात केला आहे. ही लढाई पाच तास चालली. पोर्तुगिज शिपायांनीच या किल्ल्याला 'सान्ता क्रूझ दी अलर्न' असे नाव दिले. विजयाचे प्रतिक म्हणून समोर एक क्रूझ उभा केला. पुढे किल्ल्याची दुरूस्ती करून याचा किल्लेदार म्हणून जुजे लोपेस याला नेमण्यात आले..
.
या मोठ्या विजयामुळे पोर्तुगिज सरकारने गव्हर्नर जनरलला 'मार्क्किस दी अलर्न' हा किताब दिला. पुढे त्याने तेरेखोल, निवती हे किल्लेही सावंतवाडीकरांकडून जिंकले. २६ ऑक्टोबर १७४६ ला डिचोली आणि साखळी या प्रांताच्या देसाईंनी पोर्तुगीजांचे मांडलीकत्व पत्करले. पोर्तुगीजांनी त्यांना सावंतवाडीकरांकडून मिळत असलेले हक्क अबाधित ठेवण्याबरोबरच त्यांचे पूर्वीचे गमावलेले हक्कही प्रदान केले. शिवाय त्यांना आठशे शिपायांची फौज बाळगायला परवानगी दिली..
.
――――――――――――
📷 @i___digvijay.singh 👌🏼♥️🔥
BY श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
Warning: Undefined variable $i in /var/www/tg-me/post.php on line 283
Share with your friend now:
tg-me.com/shrimantyogi1/3281